4.5.11

औरंगाबाद
 
औरंगाबाद महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. ते मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून त्याच्या मृत्यूनंतर ठेवले गेले असावे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे..

इतिहास
         औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते. काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणार्‍या खुलताबाद या छोट्याश्या गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा पुढे हैदराबादच्या निझाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरवात झाल्यानंतर इ. स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकिर्दीत एक पाण-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नाव नहर-ए-अंबरी जिचे अवशेष आजही दिसतात. तसेच येथे शहराच्या पाणचक्की भागात पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.

भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद अक्षांश उत्तर 19° 53' 47" - रेखांश पूर्व 75° 23' 54" याठिकाणी वसलेले आहे. शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे.
तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सीअसदरम्यान असते.
शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आहे
पर्जन्यमान: पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते.
सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते.

नाट्यविश्व
                  औरंगाबाद हे अनेक वर्षांपासून नाटकात महत्त्वाचे स्थान राखून आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहीली, अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चिन्मयी सुर्वे अशा कलावंतानी आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईतील नाट्यक्षेत्रात चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण,त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही. 'वर्‍हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मण देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.

अर्थव्यवस्था
                 गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रिकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.

उद्योगधंदे
          अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमुहांचे प्रकल्प औरंगाबादेत आहेत. वानगीदाखल त्यापैकी काहींची नावे अशी

    व्हिडीओकॉन
    स्कोडा ऑटो
   वोक्हार्ट
    जॉन्सन एंड जॉन्सन
    झीमन्स
    गुडइयर
    बजाज ऑटो
    कोलगेट-पामोलिव्ह
    केनस्टार
    एंड्रेस ह्युजर
    व्हीजन पेट्रोकेमिकल्स
   
 प्रसिध्द शिक्षण संस्था
             १)विद्यापीठ
               औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते.
              २)अभियांत्रिकी
                           शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय
                           मराठवाडा प्राद्यौगिकी संस्था(MIT)
                           म.गा.मि. जवाहरलाल नेहरु अभियांत्रिकी महाविद्यालय
                           पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय
                           हायटेक इंस्टीटूट आफ टेक्नोलॉजी, अभियांत्रिकी महाविद्यालय
                            देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय
                           श्रि. साई अभियांत्रिकी महाविद्यालय
                           सावित्रीबाई फुले अभियांत्रिकी महाविद्यालय
                           श्रियश अभियांत्रिकी महाविद्यालय

     ३) वैद्यकीय
                            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
                            म.गा.मि. वैद्यकीय महाविद्यालय
                            शासकीय दंतविद्या महाविद्यालय
                            भगवान होमियोपेथिक महाविद्यालय
                            फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपेथिक महाविद्यालय
                            वाय. बी. चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी

              ४)कला, वाणिज्य आणि विज्ञान
                           सरस्वती भुवन महाविद्यालय
                           देवगिरी महाविद्यालय
                           विवेकानंद महाविद्यालय
                           पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालय
                          डॊ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
                         मौलाना आझाद महाविद्यालय
                         वसंतराव नाईक महाविद्यालय
                         छत्रपती शिवाजी महाविद्यालय
                         मिलिंद महाविद्यालय
                         शासकीय महाविद्यालय
                         माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय
                         महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय
                         मराठवाडा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी

            ५)मॅनेजमेन्ट कॉलेज

                          मराठवाडा इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेन्ट & रिसर्च
                           महात्मा गांधी मिशन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
                         राजर्षी शाहू इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
                         देवगिरी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट
                         मौलाना आ़झाद इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट

 प्रेक्षणीय स्थळे
                          अजिंठा लेणी
                         वेरूळ लेणी
                         घृष्णेश्वर मंदिर (ज्योतिर्लिंग)
                        दौलताबादचा किल्ला
                        बीबी का मकबरा
                        औरंगाबाद लेणी (बौद्ध)
                        पाणचक्की
                        खुल्ताबाद
                         दरवाजे
                                   मुघल शासनकालात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिध्द आहेत
                        गौताळा अभयारण्य
                         म्हैसमाळ
                        संत ज्ञानेश्वर उद्यान
                        पैठण
                        जायकवाडी धरण पक्षी अभयारण्य
                        बीबी का मकबरा
                       ( औरंगाबाद इथे अंदाजे १५०० सुफ़ी संताना दफनविण्यात आलेले आहे)

28.4.11

मॅनेज (ME )

आपल्याकडे भलेही स्विस बँकेत टाकावे एवढे पैसे नसतील,                 
पण जेवढे आहेत ते तरी व्यवस्थित वापरायला शिकलं पाहिजे ना?
नाही तर पैसा येतो आणि जातो, आपला खिसाच रिकामा..!
ऑनलाईन मनी मॅनेजर्सची मदत घेऊन पै-पै चा हिशेब
ठेवता येऊ शकतो..!
                                                         

१. कॉलेजात शिकणाऱ्या शैलेशची डायरी

जानेवारी २०११ :
मिळालेला पॉकेटमनी : १२०० रुपये
झालेला खर्च :
पेट्रोल : ३५० रुपये
सिनेमा : २०० रुपये
स्नॅक्स : १५० रुपये
मोबाईल रिचार्ज : २०० रुपये
इतर : २००
---------------------------
एकूण खर्च : रुपये ११००
शिल्लक : रुपये १००


२. सॉफ्टवेअर प्रोफेशनल केदारची डायरी

जानेवारी २०११

रिलायन्स फ्रेश : ३५५ रुपये
इनॉरबिट मॉल (कपडे) : १६९० रुपये
सिनेमा: ४५० रुपये
स्नॅक्स आणि डिनर : ३७५ रुपये
पेट्रोल: १५०० रुपये
क्रेडिट कार्ड पेमेंट: ८००० रुपये
इन्शुरन्स प्रीमियम: ५००० रुपये
इतर: ५००० रुपये
---------------------------
एकूण: २२३७० रुपये

जानेवारीत सुरू केलेला हा उपक्रम फेब्रुवारीत बारगळतो आणि मग थेट पुढच्या वर्षी डिसेंबरातच पुन्हा जाग येते. तोपर्यंत शैलेशसारख्यांना महिनाअखेरीच्या तंगीची आणि केदारसारख्यांना इन्कम टॅक्सची झळ पोचलेली असते. आता या वर्षापासून व्यवस्थित हिशेब ठेवायचा, असा दृढनिश्चय आपण करतो. तो जेमतेम महिनाभर टिकतो. यात आपला दोष नाही. शहरात राहून नोकरी करणाऱ्यांना दोन-तीन बँक अकाऊंटस, एखादे-दुसरे क्रेडिट कार्ड, घराचे किंवा गाडीचे हप्ते, इन्शुरन्स प्रीमियम, शेअर्स, इतर ठिकाणी केलेली सेव्हिंग्ज, महिन्याचा खर्च हे सगळं कागदावर उतरवणं आणि त्याचा हिशेब राखणं हे अत्यंत अवघड काम आहे. कधी कोणत्या क्रेडिट कार्डाचे पैसे भरले आणि कधी मॉलमधून कपडे खरेदी केले, हे दोन-तीन महिन्यांनंतर विचारले तर लक्षातही येणार नाही.
अशावेळी आपण ऑनलाईन मनी मॅनेजर्सची मदत घेऊ शकतो. आजच्या लेखात अशाच काही देशी-विदेशी मनी मॅनेजर्सबद्दल जाणून घेऊयात.

१. इलेक्ट्रिक चेकबुक :
अमेरिकन लोकांना समोर ठेवून तयार केलेली ही ऑनलाईन सेवा डॉलरचे चिन्ह वगळले तर कोणत्याही देशातली व्यक्ती वापरू शकते. यावर रजिस्टर झाल्यानंतर सर्वप्रथम तुमचे अकाऊंट तयार करावे लागते. उदा. तुम्ही तुमच्या दोन बँकांसाठी दोन वेगळे अकाऊंटस तयार करू शकता. महिन्याच्या सुरवातील जमा होणारी रक्कम एंटर केल्यानंतर ज्या खर्चाच्या बाबी आहेत, म्हणजे क्रेडिट कार्ड, मोबाईल बिल, लाईट बिल वगैरे माहिती भरत जावी लागते. प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या जमा-खर्चाचा हिशेब तुमच्या समोर येत जाईल. आता कुठले बिल कोणत्या अकाऊंटमधून, किती तारखेला भरले याचाही ट्रॅक ठेवता येईल आणि असलेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापनही करता येईल. महिनाअखेरीस बसणाऱ्या शॉकपासून वाचायचे असेल तर इलेक्ट्रिक चेकबुक वापरून पाहायलाच पाहिजे.
(http://electriccheckbook.com/ )

२. बक्स्फर :
इलेक्ट्रिक चेकबुक ही सेवा केदारासारख्य नोकरदार व्यक्तींना अधिक उपयोगी ठरते. शैलेशसारख्या कॉलेजगोअर्सनी बक्स्फर ही सेवा वापरायला हरकत नाही. विद्यार्थीदशेत महिनाअखेरीस उधारी घेण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे आज याच्याकडून १०० रुपये घे, उद्या त्याच्याकडून ३० रुपये घे, असे प्रकार नित्याचे असतात. काही जण विश्वासाने पैसे देतात आणि काही जण ते इमाने-इतबारे परतही देतात. पण सगळेच एवढे नशीबवान नसतात. सख्ख्या मित्राला, तू पैसे बुडवलेस, असं कसं म्हणणार? अशा भिडस्त स्वभावाचा सख्खा मित्र गैरफायदा घेतो आणि आपले पैसे कायमचे बुडतात. अशा वेळी तुम्ही बक्स्फर वापरून तुमचे सगळे हिशेब चोख ठेवू शकता.
(http://www.buxfer.com/ )

३. अर्थमनी
अर्थमनी ही मनी मॅनेजमेंटसाठी तयार झालेले बहुधा पहिलेच ऑनलाईन पोर्टल आहे. गेल्या वर्षी सुरू झालेया या पोर्टलमध्ये पर्सनल फायनान्स अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवांचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. यात बँक अकाऊंटसह शेअर ट्रेडिंग अकाऊंट, विविध विमा योजना, विविध बचत योजना, म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड आदी सर्वांचे व्यवस्थापन करता येऊ शकते. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ही सेवा मोफत वापरू शकता.
(http://www.arthamoney.com )

४. पैसागेट
पैसा गेट या आणखी एका भारतीय वेबसाईटनं मनी मॅनेजमेंट अगदीच सोपं करून टाकलं आहे. यावर रजिस्टर झाल्यानंतर दर महिन्याच्या सुरवातीला बजेट एंटर करायचे. त्यानंतर केवळ एसएमएसच्या माध्यमातून तुम्ही तुमचे अकाऊंट मॅनेज करू शकता. उदा. एखाद्या ठिकाणी तुम्ही कॉफी घेतली की पैसागेटला कॉफी ३० रुपये असा एसएमएस करायचा. पैसागेट हा खर्च तुमच्या अकाऊंटमध्ये मांडून शिल्लक रक्कम किती आहे हे तुम्हाला कळवेल. ही सेवा तीस दिवसांसाठी मोफत वापरता येते. त्यानंतर विविध प्लॅन्समधून तुम्ही प्लॅन निवडू शकाल.
(http://www.paisagate.com/ )

५. मॅनेज मी :
मॅनेज मी या आणखी एका भारतीय ऑनलाईन मनी मॅनेजमेंट पोर्टलमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व सुविधा मिळतात. याशिवाय तुम्ही यात एकाच वेळी विविध देशांची चलनं वापरू शकता. केदारसारख्या सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सना अनेक वेळा परदेशात जावे लागते. अशा वेळी त्यांच्याकडील विविध चलनांची रक्कमही या पोर्टलच्या आधारे मॅनेज करता येणं शक्य आहे.
( http://www.manageme.in/)

या पाचही सेवा वापरण्यास अत्यंत सोप्या आहेत. आपल्याकडे भलेही स्विस बँकेत टाकावे एवढे पैसे नसतील, पण जेवढे आहेत ते तरी व्यवस्थित वापरायला शिकलं पाहिजे ना? मग वाट कशाची बघता, करा सुरवात...आजपासूनच!

24.4.11

मराठी ब्लॉगर्सचे

काही मराठी ब्लॉगर्सचे मराठी ब्लॉग्ज....












































माझ्याबद्दल...!

माझ्याशी संपर्क साधा:

माझ्या बद्दल काही सांगणे यात काही विशेष असे नाही.मी तसा साधाच.कुणावर ही चटकन विश्वासं ठेवणारा ओळख झाली की मैत्री करणारा आणि मैत्री झाली की जिवापेक्षा जास्त जपणारा पण इतरांसारखा सामान्यपणे जगणारा यातला मी नक्कीच नाही,काहीतरी वेगळे करायचे हेच नेहमी डोक्यात असते. बाकी काही माझ्याबद्दल माहिती करून घेयचे असेल तर मला संपर्क करा कधीही मी सध्या पी.ई.एस. अभियांत्रिकी महविद्यालयात ,औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे माहिती तंत्रज्ञान शाखेच्ह्या शेवटच्ह्या वर्षाला शिक्षण घेत आहे .Young, sensitive, middle-class IT Student with fair amount of interest in साहित्य, कला, संस्कृती !!.
बाकी काही माझ्याबद्दल माहिती करून घेयचे असेल तर मला संपर्क करा कधीही तर ते तुम्ही मला खालील फॉर्म भरून कळवू शकता.






तुमचे नाव:
इ-मेल पत्ता:
विषय:
संदेश मजकूर:
आपण खरे व्यक्ती आहात ना!

 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | cheap international voip calls